*डॉ. सोमनाथ मुटकुळे यांच्या तीन पुस्तकांचे होणार दिल्लीत प्रकाशन*
संगमनेर
लेखक ,कलावंत, समीक्षक, डॉ.सोमनाथ मुटकुळे लिखित तीन पुस्तकांचे प्रकाशन दिल्ली येथे होणा-या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात होणार आहे.डॉ .सोमनाथ मुटकुळे नाट्य क्षेत्राच्या माध्यमातून आजवर मोठ्या प्रमाणावर लेखन करून समाज प्रबोधन केले आहे. त्यांच्या "खेळ मांडीयला" या नाटकाला राज्य शासनाच्या वतीने भा.रा. तांबे यांच्या नावाने दिला जाणारा पन्नास हजाराचा पुरस्कारही मिळाला आहे. त्याचबरोबर यापूर्वी त्यांची लेखन संहिता, नाट्य कलाकार म्हणूनही त्यांना अनेक संस्थांनी पुरस्कार देऊन गौरवले आहे. त्यांनी लिहिलेले राजश्री, निवडुंग, चक्र अशी तीन पुस्तके प्रकाशित केली जाणार आहेत. या तीन पुस्तका मध्येच एकूण दहा नाटकांचा समावेश करण्यात आला आहे. नाट्य लेखनाच्या माध्यमातून त्यांनी महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यासारखे राष्ट्रपुरुषाचे विचार त्यांनी जिवंत केले आहेत. नाटकाचे माध्यमातून त्यांचे विचार समाजमनात रुजवण्यासाठी त्यांनी केलेल्या लेखनाचा अनेक मान्यवरांनी गौरव केला आहे. .दिल्लीत 21 ते 23 फेब्रुवारी या दरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सदर पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे. हे पुस्तक पुणे येथील चपराक प्रकाशन यांनी प्रकाशित केले आहे तसेच. संमेलनातील संत महिपती महाराज प्रकाशन "कट्ट्यावरती" या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थित करण्यात येणार असल्याची माहिती प्रकाशक घनश्याम पाटील यांनी दिली.