ब्रेकिंग न्यूज :
भारत

महाराष्ट्र झाडी वृक्षाने बहरला पाहिजे :- सयाजी शिंदे

Blog Image
एकूण दृश्ये: 238

महाराष्ट्र झाडी वृक्षाने बहरला पाहिजे :- सयाजी शिंदे.   

निसर्गाशी मैत्री करण्यासाठी विद्यार्थ्यांनी काढली दिंडी

नगर पालिकेने वड पिंपळाचे केले प्रवरा संगमात पुनर्रोपण 

     संगमनेर भारत रेघाटे

सावध रहा ,झाडे तोडू नका, झाडे तोडू देऊ नका ! झाडांमुळे माणूस आहे. माणसांमुळे झाडे नाहीत. जगात पहिले झाड आले. नंतर माणसं आली. माणूस गेला तरी, झाड टिकणार ! झाड गेले तर ,माणूस अजिबात टिकणार नाही. महाराष्ट्रात वड, पिंपळ, लिंब, छोटी, मोठी झाडे लावून बहरू द्या. झाडी बहरण्यासाठी माणसाने काम केलेच पाहिजे असे प्रतिपादन अभिनेते, वृक्षमित्र सयाजी शिंदे यांनी केले.

     प्रवरा म्हाळुंगी संगमावर निसर्गरम्य अशा संगमावर नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. तत्पूर्वी अभिनेते शिंदे यांच्या हस्ते वृक्षपूजन करण्यात आले. ते म्हणाले की, जिवंत असेपर्यंत झाडावर प्रेम करा. झाडांचा वाढदिवस साजरा करा. सावध रहा, वृक्ष संवर्धनाचे उपक्रम राबवा. झाडाला जगवू, आपणही जगू असे म्हणत संगमनेर नगर पालिकेने झाडांना जीवदान दिल्याबद्दल या कामगिरीचे त्यांनी भरभरून कौतुक केले. 

 *निसर्गाशी मैत्री करण्या निघाली दिंडी* 

एकीकडे पंढरपुरी गेली वारी आषाढी।

निसर्गाच्या मैत्रीसाठी निघे संगमनेरी दिंडी ।       

वृक्षवेली ने बहरेल प्रवरेतील झाडी ।

प्रवरा म्हाळुंगी संगम वाहो सदैव दुथडी।

----- Advertisements -----

        माझी वसुंधरा अंतर्गत संगमनेर नगरपालिका सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबवत असते. पर्यावरणाची काळजी घ्या, झाडे लावा, झाडे जगवा, भारत माता की जय ,सायकल चालवा ,इंधन वाचवा. कापडी पिशवी घरोघरी, पर्यावरण रक्षण करी. वृक्षांचे जतन संवर्धन करा असा मौलिक संदेश देतनगर पालिका शाळा क्रमांक एक ते पाचच्या विद्यार्थ्यांनी निसर्गाची मैत्री करण्यासाठी वृक्ष भेटी साठी नगरपालिका ते प्रवरा संगमा वरील शांती घाट पर्यंत विद्यार्थ्यांची दिंडी निघाली. यामध्ये मुख्याध्यापक शिक्षक, शिक्षिका, यांनी सहभाग घेतला. 

 *यांची होती उपस्थिती* 

पालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे, राष्ट्रवादीचे  अजीत पवार गटाचे कपिल पवार, सामाजिक कार्यकर्ते गणेश बोराडे, सीताराम राऊत, वृक्षारोपण विभाग, आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभाग प्रशांत जुन्नरे, पंकज मुंगसे, महेश गोर्डे ,जयराम मंडलिक, अमजद पठाण, राजेंद्र मस्के, शशिकांत जोशी, रमेश ताजणे, राजू गवंडी, आदि उपस्थित होते.

निस्वार्थपणे काम केले, तरच जीवन यशस्वी होते.

संत तुकाराम