भारत

*प्रतिस्पर्धी होऊ नका ; प्रतिदीप व्हा ! प्रा. प्रदीप कुलकर्णी*

Blog Image
एकूण दृश्ये: 29

*प्रतिस्पर्धी होऊ नका ; प्रतिदीप व्हा ! प्रा. प्रदीप कुलकर्णी* 

 _विद्या सिद्धी पुस्तकाचे प्रकाशन_ 

प्रत्येक व्यक्ती ज्ञान आत्मसात करत असतो. परंतु गुणवत्तापूर्ण आणि गुणवत्तावर्धक ज्ञान माणसाला शंभर टक्के सक्सेस मिळवून देते. आपण कुठे कमी पडतो ? याचे आत्मपरीक्षण केले पाहिजे. आपली स्पर्धा इतर कोणाशी न करता स्वतःशी असली पाहिजे. त्यातूनच आपण शंभर टक्के सक्सेस मिळू शकत़ो, प्रतिदीप बनू शकतो. चांगल्या मार्का बरोबरच चांगले संस्कार आणि संस्कृती आपल्या मनावर बिबवली पाहिजे, रुजवली पाहिजे असे प्रतिपादन प्रा. प्रदीप कुलकर्णी यांनी केले. 

कृष्णा गार्डन येथे "विद्या सिद्धी" या पुस्तकाचे प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. तत्पूर्वी अतिथी मान्यगणांच्या हस्ते सरस्वती देवी, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. कुलकर्णी पुढे म्हणाले की,

----- Advertisements -----

आपल्याला जीवनामध्ये योग्य मार्ग दाखवणारे माणसे भेटली पाहिजे. यातून आपले व्हिजन पूर्ण होते. 15 जून म्हणजे शाळा सुरू होण्याचे दिवस. योगायोग आज पितृ दिवस त्याचे उचित्य साधून विद्या सिध्दी पुस्तक प्रकाशनाचा योग साधण्यात आला. शिक्षण प्रणाली मध्ये शास्त्रशुद्ध सायंटिफिकली शिक्षणाची गरज असल्याचे सांगत, तोच आपला राजमार्ग असल्याचे ते म्हणाले.   

         आयुष्यात काही बनायचे असेल तर आळस दूर ठेवला पाहिजे. स्पर्धेच्या या युगामध्ये विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. यासाठी आपण वेळेची सांगड घालून विद्या सिद्धीची वेगळी पद्धत  अवलंब केली पाहिजे असे कुलकर्णी म्हणाले. योगेश आहेर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन प्रतिदीप सोशल फाउंडेशन च्या वतीने करण्यात आले होते. यावेळी बाळासाहेब गायकवाड कार्यकारी सचिव प्रणाली चिमूरकर, संचालिका अनुराधा रच्चा, ज्ञानेश्वर गायकवाड, रमेश वडलाकोंडा 

----- Advertisements -----

यांच्यासह पालकवृंद विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. साक्षी जाधव या इंजीनियरींगच्या विद्यार्थ्यानीने आपले मनोगत व्यक्त करताना कवितेतून शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमा मध्ये सहभाग घेत धमाल केली. सूत्र संचालन भारत रेघाटे यांनी केले. प्रास्ताविक संदीप रच्चा यांनी तर आभार श्रीनिवास अमृतवाड यांनी मानले.

परिस्थिती हीच आपल्या आयुष्याची खरी परीक्षा असते.

संत तुकाराम