भारत

संत कान्हांच्या दुर्मिळ हस्तलिखितावर प्रकाशझोत ,

Blog Image
एकूण दृश्ये: 164

संत कान्हांच्या दुर्मिळ हस्तलिखितावर प्रकाशझोत, साडे चारशे वर्षांपूर्वीचा बेलखेड गावचा इतिहास उजेडात ; परिसरातील समाधीस्थळ, धार्मिक स्थाळावर भारत रेघाटे यांचे संशोधन

        उमरखेड { प्रतिनिधी }

नाथ संप्रदायातील महत्वाचे संत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत हरिदाससुत कान्हा यांचे समाधीस्थळ बेलखेड येथे असून त्यांचे पुरातन हस्तलिखित धुळे येथील समर्थ वाग्देवता मंदिरात आढळून आले आहे. शके १५३१ मध्ये लिहून पूर्ण केलेला हा दुर्मिळ ग्रंथ ४२५ वर्षां नंतरही सुस्थितीत आढळून आल्याचे अभ्यासक भारत रेघाटे यांनी सांगितले.

   15 फूट लांब 12 फूट रूंद मोठ्या अखंड पाषाणावर बारा ज्योतिर्लिंग आहेत.

विदर्भ आणि मराठवाडा सीमेवरील यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात असलेल्या बेलखेड येथे संत हरिदाससुत कान्हा यांची समाधी आहे. त्यांचा भक्त संप्रदायही मोठा आहे. त्यांच्या कार्याची, कर्तृ्त्वाची माहिती व्हावी म्हणून अभ्यासक, संशोधक भारत रेघाटे प्रयत्नशील होते. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. 'स्वात्मानुभाव' या नावाने लिहिलेले हस्तलिखित ओवीबद्ध असून प्राकृत भाषेत आहेत. सुमारे आठशे पानांहून अधिक पाने संताचा 'स्वात्मानुभाव' उलगडतात. संत कान्हा यांचे वडील बोपा चिल्लाळ की हरिदास याबाबत नेमका उलगडा होत नाही. जनमाणसात ज्ञात असलेली ओळख हरिदाससुत कान्हा, प्राकृत ओवीबद्ध ग्रंथात हरिदाससुत कान्हा अश्वलायन शाखीय बोपा चिल्लाळ यास तीन मुलगे. पहिला चिल्लाळ दुसरा विठ्ठल तिसरा कान्हा हे "बिल्वखेट" गावचे. शके १५३१ कार्तिक शुद्ध १२ मध्ये "सात्वानुभव" हा ग्रंथ संपूर्ण झाला. इदं पुस्तकं देवदाणु चरेन आनंदेन लिखितम असा संदर्भच या हस्तलिखितात आहे. २०२५ आज मितीस ला या हस्तलिखिताला ४१६ वर्ष पूर्ण होतात. या हस्तलिखितातील संबंध नि संदर्भ बेलखेड गावशी जोडलेला आहे. एवढा जुना ऐतिहासिक अमूल्य ठेवा सापडल्याने खूप आनंद झाल्याची भावना भारत रेघाटे यांनी व्यक्त केली असून आपल्या संशोधन आणि लिखानास चांगली गती मिळेल असा विश्वास रेघाटे यांनी व्यक्त केला. 

----- Advertisements -----

     संत कान्हांना दोन ज्येष्ठ बंधू होते. त्यांची नावे चिल्लाळ, विठ्ठल आणि लहान तो कान्हा. बोप्पा चिल्लाळ यास तीन मुलगे असा संदर्भ हस्तलिखितात आहे. बेलखेडचे जुणे नाव बिल्वक्षेत्र, बिल्वग्राम असल्याचा संदर्भ प्रा. डॉ. बा. दा. जोशी, माझे वडील शामराव रेघाटे, अनंतराव वान्नरे, धों. तु. वाघ, शेषराव पाटील, सुंदर भांगे, नामदेव फटिंग आदि ग्रामस्थ सांगतात. धुळे येथील समर्थ वाग्देवता मंदिरात आढळून आलेल्या हस्तलिखितात बेलखेड गावचा उल्लेख 'बिल्वखेट' असाच आढळून आल्याचे निरीक्षण अभ्यासक भारत रेघाटे यांनी नोंदविले आहे.

       कान्होबाचे वावर.                                      

 संत कान्हा (कान्होबा) यांची समाधी बेलखेड येथील शेषराव नारायणराव पाटील यांच्या शेतात आहे. याच शेताला *कान्होबाचे वावर* असा नामोल्लेख समस्त पाटील परिवार आणि ग्रामस्थ आजही करतात. संत तुकाराम महाराज ( येहळेगाव ) देवस्थानची दिंडी बारा ज्योतिर्लिंग , संत हरिदाससुत कान्हा यांची समाधी (बेलखेड) अशी पायी दिंडी या भागातील भक्त मंडळी मे- जून महिन्यातच काढत असतात. मधल्या काळात कान्हा यांची समाधी दुर्लक्षित झाली होती. दिलीप पाटील, भगवान पाटील, राजेश पाटील, गजानन पाटील, नरेंद्र पाटील, अतुल पाटील आदींनी या समाधीचा कायापालट केला. समाधी असलेल्या या शेताला  पाटील परिवार गावकरी 'कान्होबाचे वावर' म्हणून संबोधतात असे रेघाटे यांनी सांगितले.

 नदीपात्रात आहे बारा ज्योतिर्लिंग.      

----- Advertisements -----

   -- विदर्भ मराठवाडा सीमेवर पैनगंगा नदी पात्रात अखंड काळ्या पाषाणावर बारा ज्योतिर्लिंग स्थित आहे. सनातन धर्माचे शाश्वत मूल्ये ती शिव तत्त्वात दडलेली आहेत. दक्षिण वाहिणी असलेल्या पैनगंगा नदीच्या कुशीत ज्योतिर्लिंग आपले अस्तित्व आजही टिकवून आहे. कालौघात नदी पात्रात एकरूप होण्याआधीच त्यांचे जतन संवर्धन होणे गरजेचे आहे. पुरातत्व विभागाने अशा स्थळाचे पुनरूत्थान करावे अशी मागणी भारत रेघाटे केली आहे. गावातील सामाजिक कार्यकर्ते सुदर्शन कदम, अमोल धुमाळ, आदि युवक यासाठी अनेक वर्षांपासून यासाठी प्रयत्नशील आहे. या बारा ज्योतिर्लिंगावरून हाकेच्या अंतरावर वसलेले "बारा" हे नाव असलेले गाव आहे. पंचक्रोशीतील बेलखेड, बारा, पेवा, करोडी अशा गावाची नाळ या ज्योतिर्लिंगाशी जोडलेली आहे. मे अखेरीस जून महिण्यात संत तुकाराम महाराज (येहळेगाव) यांची दिंडी या ज्योतिर्लिंगाचे आणि संत हरिदाससुत कान्हा यांच्या समाधीचे दर्शन घेत माहूरकडे मार्गक्रमण करते. यामध्ये मरडगा येथील ग्रामस्थ असतात. परंतु कोरोना नंतर या दिंडीमध्ये बऱ्यापैकी खंड पडत चालला असून आता या दिंडीचे प्रमाणही कमी होत आहे परंतु धर्म रक्षणार्थ या ऐतिहासिक, धार्मिक पाऊलखुणावर ही पवित्र पावले परत येतील का असा प्रश्नही आता ग्रामस्थ विचारत आहेत.

 

    आदिनाथाची परंपरा.                 

संत हरिदासांची वंश परंपरा आदिनाथाशी जुळती आहे. याच परंपरेत बोपा चिल्लाळ, यास चिल्लाळ, विठ्ठल, कान्हा या तिन्ही मुलांचा उल्लेख या हस्तलिखितात आढळतो. आदिनाथ, मीननाथ, गोरक्षनाथ, मुक्ताई, चांगावटेश्वर, चक्रपाणि, विमलानंद, चांगाकेशवदास ( पुणतांबे ), जनकराज, नृसिंह, हृदयानंद, विश्वेश्वर, केशवराज ( बोपया, हरिदास,कान्हा ), सदानंद कृष्ण, श्यामसुंदर, अनंत प्रल्हाद, नागया, एकनाथ नाना, विठ्ठल किंकर (पुसद), चिन्मयानंद (उमरखेड) सहजानंद , तुकाराम महाराज-ब्रह्मानंद ( येहळेगाव ) पूर्णानंद , सच्चिदानंद, शिवरामानंद, नित्यानंद, रामानंद, वासुदेवानंद, पुरुषोत्तमानंद, वामनानंद, माधवानंद अशी ही परंपरा आहे.

----- Advertisements -----

( छायाचित्र साई फोटो स्टुडिओ विजय रेघाटे )

गावात अनेक ठिकाणी आहेत महादेवाच्या पिंड.                               पूर्वीचे बिल्वखेट आताचे बेलखेड, उमरखेड परिसरात संत, महंत, साधू मठ, नाथ संप्रदाय माहूर तसेच साधु महाराज यांच्या आठवणी आणि पाऊलखुणा आजही आपल्याला या परिसरात खुणावताना दिसून येतात. उमरखेड येथील रामचंद्र वाजे हे महानुभाव कवी होऊन गेल्याचा संदर्भ आढळतो. बेलखेड येथील इनामदार संत साधू महाराज यांनी १८१५ मध्ये अवतार कार्य संपविले. त्यांची समाधी येथेच आहे. साधू महाराजांना आपल्यातून जावून आज १३२ वर्ष होतायेत. परिसरातील घटनाचे संशोधन सुरूच राहणार असल्याचे रेघाटे यांनी सांगितले.

 लोकसहभागातून वृक्षारोपण.                     

 ------लोकसहभागातून गावात,  शेतात, परिसरात बेल, पिंपळ, वड, साग, लिंबाच्या झाडाचे वृक्षारोपणही करण्यात येत आहे. खरंतर फार पूर्वी या परिसरात हजारोंच्या पट्टीत बेलाची झाडे होती. यावरूनच या गावाचे नाव बिल्वग्राम, बिल्वक्षेत्र असल्याचे ग्रामस्थ सांगतात. परंतु हस्तलिखितात 'बिल्वखेट' हा स्पष्ट उल्लेखच आता आढळून आला असल्याने ४५० वर्षा पूर्वीचा भक्कम पुरावाच उपलब्ध झाला. परंतु कालांतराने या भागातील बेलाची झाडेच नामशेषही झाली ती पून्हा नव्याने लावण्यचा प्रयत्न सुदर्शन कदम यांच्या मार्गदर्शनातून आजही सातत्याने सुरू आहे.

पुरातत्व विभागाने लक्ष घालावे

-------- नदीपात्रात मध्यभागी १२ ते १५ फूट उंच असलेला १२ जोतिर्लिंगाचा काळा पाषाण अनेक पुराच्या पाण्याने जमीन दोस्त आणि नदीपात्रात एकरूप होत आहे. याबाबत जनमानसात जनजागृती होण्यासाठी अनेक वेळा बातम्यांच्या माध्यमातून प्रकाशझोतात आणण्याचे कामही केले. खरंतर अशा प्राचीन वस्तू पुरातत्त्व विभागाने दखल घेऊ त्याचे जतन संवर्धन केलेच पाहिजे.

आमचा अस्तित्वाचा ठेवा आहे..           बेलखेड येथील युवकांनी उदात्त  हेतू नजरे समोर ठेवून तब्बल 3 ते 4 फूट गाळ माती खोदून ज्योतिर्लिंग पाषाणाचा बराच भाग उघड केला. त्यानंतर नाल्याचे पाणी आणि त्यातून वाहून येणारा ज्योतिर्लिंगावर गाळ साचला जावू नये म्हणून त्याला दुसऱ्या बाजूने जेसीबीच्या सहायाने काढले. तसेच भक्तांना पूजा करण्याची गैरसोय होऊ नये म्हणून नदीपात्राच्यावर अमोल धुमाळे यांनी स्वखर्चाने एक छोटे खाणी मंदिर उभे केले. तिथे पिंड ठेवली. दर सोमवारी पंचक्रोशी मधील हजारो महिला पूजेसाठी येतात.‌ तसेच महाशिवरात्री ला पूजा अर्चा भजन कीर्तन या ठिकाणी होतात.महापंगत केली जाते. भविष्या मध्ये नदीच्या पात्रात मध्यभागी ईश्वराचे मंदिर बांधायचे आहे. त्याकरिता इसापूर धरणाचे येणारे पाणी वळवून बांध टाकण्याचा मानस असल्याचे अमोल धुमाळे, साहेबराव धुमाळे, बबन ठाकरे, भास्कर धुमाळे, सुभाष धुमाळे, गजानन धुमाळे, बळीराम धुमाळे, संजय डोंगरे ,लोडबा कदम, पंजाब काळे, रमेश कदम, नेहरू कदम, बंडू सूर्यवंशी, डॉ .लक्ष्मण कदम, भगवान पाटील, अनिल वाघ, सुरेश पाटील, बाजीराव पाटील, जयवंतराव कदम, परशुराम कदम, हरीभाऊ भंडारे आदिंनी सांगितले.

पर्यटन स्थळ म्हणून घोषित करावे.       --माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या निधनानंतर वाशिम मतदार संघाचे सूत्र गुलाब नबी आझाद यांच्याकडे आली. या भागात रेल्वे आणू असा शब्द ४० वर्षांपूर्वी आझादांनी दिला होता. वाशिम मतदार संघाचे ते खासदार झाले. त्यांच्या कारकीर्दीत रेल्वे मात्र आलीच नाही. आज रेल्वे मार्गाची आखणी या भागातून झाली असून तब्बल ४० वर्षानंतर आता या भागात रेल्वे येत आहे. त्याचे कामही अंतिम टप्प्यावर आहे. बेलखेड पासून अवघ्या दोन किलो मीटरवर असलेला रेल्वेमार्ग आणि या भागातील पुरातन धार्मिक स्थळ, ऐतिहासिक स्थळांचा पर्यटन स्थळात समावेश झाल्यास रोजगार निर्मिती होऊन परिसराच्या विकासाला चालना मिळेल असे रेघाटे यांनी सांगितले.

निस्वार्थपणे काम केले, तरच जीवन यशस्वी होते.

संत तुकाराम