सरकारने डोकं फिरवायची वेळ आणली; पाच सहा महिने उलटून निराधार झाल्या लाडक्या बहिणी
संगमनेर { भारत रेघाटे }
गेली पाच सहा महिन्यापासून अनेक महिलांचे संजय गांधी निराधार तसेच लाडक्या बहिणीचे पैसेच जमा होत नसल्याने महिलांनी सरकार बद्दल रोष व्यक्त करताना "आता आमचे डोकं फिरण्याची वेळ" या सरकारने आणली आहे. असे म्हणत निवडणुकीत आमीष दाखवत आणि निवडणुकी नंतर दोन महिनेच निधी बँकेत जमा होत होता. परंतु आता पाच सहा महिने उलटूनही संजय गांधी निराधार आणि अनेक लाडक्या बहिणीचे पैसे मानलेला भाऊ आता पैसा पाठवत नसल्याने पैसेच येत नाही. आम्ही उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न रजनी आमले, सुभद्रा गगे , सुनिता निचल या सारख्या अनेक महिला आणि लाडक्या बहिणींना पडला असून आता भावना नव्हे तर त्या राग व्यक्त करताना म्हणाल्या की, आमच्या सारख्या अनेक महिलांचे संजय गांधी निराधार योजने बरोबरच लाडक्या बहिणीचेही पैसे पाच पाच सहा सहा महिन्यापासून जमाच होत नसल्याने नाराजी व्यक्त करीत असल्याचे दिसून येत आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना' ही
महिला सक्षमीकरणासाठी बरोबर लाडक्या बहिणींना लक्ष्मीकरण करण्याची योजना अंमलात आणत या योजनेतून निवडणूकी पूर्वी १५०० रू दिले जात असत निवडणूकीत.सत्तेवर आल्यानंतर १५०० ऐवजी २१०० रूपये देण्यात येतील अशी घोषणा केली होती. वाढ तर सोडा परंतु एक पै गेली अनेक महिने जमाच झाला नसल्याचे महिलांचे म्हणणे आहे. पैसेच न आल्यामुळे आम्हाला टेन्शन आले आहे. कारण या उतार वयामध्ये आम्ही काम करू शकत नाही. आम्ही निराधार असल्यामुळे आमचा उदरनिर्वाहाचा प्रश्न ग़ंभीर होत चालला आहे. आम्ही एकट्या दुकट्या आणि वयाने सतरी पार केली असल्याने कामासाठी बाहेर पडू शकत नाही. मुली लहान असल्याने घरदार सोडू शकत नाही.
इलेक्शनच्या काळामध्ये सरकारने केवळ आमीष दाखवले की काय ? अशा खोचक प्रश्न या महिलांनी सरकारला विचारला असून महिलांनी आपल्या भावना व्यक्त करतांना त्या अश्रू अनावर झाल्या. आमचा निधी त्वरीत बँकेत जमा करावा अशी मागणी येथील महिलांनी केली आहे.