शिवरायांचे विचार आचरणात आणा- आमदार खताळ
शिवराज्याभिषेका निमित्त दुग्धाभिषेक महाआरती
संगमनेर प्रतिनिधी
स्वतःच्या स्वार्थासाठी नव्हे तर रयतेच्या हितासाठी स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार सर्वांनी आचरणात आणावे असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे महायुतीच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन मोठाया उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी आमदार खताळ बोलत होते. शिवराज्याभिषेक दिना निमित्त आमदार खताळ यांच्या हस्ते छत्रपतीं शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून खताळ यांच्यासह महायुती पदाधिका-याच्या हस्ते महाआरती करण्यात आली. खताळ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेच्या हितासाठी काम केले. अशा आदर्श विचाराचा अंगीकार करून रयतेच्या हितासाठी आपण काम करणार असल्याचे सांगून
शहरात सर्व महापुरुषांच्या जयंती उत्सव साजरे केले जातील असे जाहीर केले होते. त्यानुसार महापुरुषाची जयंती उत्सव धुमधडाक्यात साजरे करत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महायुतीचे रामभाऊ राहणे, प्रमोद राहणे, संभाजी गुंजाळ, दिनेश फटांगरे ,विनोद सूर्यवंशी, रमेश काळे ,ज्ञानेश्वर कर्पे, शिरीष मुळे, कैलास कासार, ॲड संग्राम जोंधळे, पायल ताजणे, ज्योती भोर, दीपाली वाव्हळ ,सौरभ देशमुख, शशांक नामन, राहुल भोईर ,अमोल दिघे ,आशीष कानवडे, ॲड. संदीप जगनर, शैलेश फटांगरे, सुशील शेवाळे, वरद बागुल ,निलेश गुंजाळ ,संपत गलांडे, अक्षय वर्पे ,रणजीत जाधव, सार्थक शेवाळे, योगेश गुंजाळ ,समर्थ कट्यारे, दिलीप खताळ, बाळासाहेब व्यवहारे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.