भारत

तरच जग वाचेल ! प्रा खरात

Blog Image
एकूण दृश्ये: 20

 

 

तरच जग वाचेल;  प्रा खरात

     संगमनेर प्रतिनिधी

सर्व देशांनी मिळून पर्यावरणास प्रथम प्राधान्य दिले पाहिजे, तापमानवाढी मध्ये जग आणि देश वाचणार नाहीत. मानव ही वाचणार नाही. दिवसेंदिवस तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे ही चिंताजनक बाब आहे. ऋतुमान चक्र बदलत चालले आहेत. त्याचा गंभीर परिणाम मानवी जीवना बरोबर पर्यावरणावर होत आहे. याचे महत्त्व लक्षात घेऊन 2006 मध्ये तालुक्याचे भाग्यविधाते थोर स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात यांनी परिसरातील लोकांना एकत्र करून लोकाभिमुख आणि सामाजिक संदेश दिला असे प्रतिपादन प्राध्यापक बाबा खरात यांनी केले. 

       ५ जून हा जागतिक पर्यावरण दिवस म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. स्टॉकहोम येथे १९७२ ला जागतिक पर्यावरण परिषद आयोजित करण्यात आली त्या परिषदेमध्ये थिंक टॅंक तयार करण्यात आला. आणि त्या परिषदेमध्ये पर्यावरण बाबत काही निर्णय घेण्यात आले. 

       जागतिक पर्यावरण दिना निमित्त अमृत उद्योग समूहात वृक्षारोपण प्रसंगी ते बोलत होते. खरात म्हणाले की, आपली भावी पिढी वाचू शकणार नाही म्हणून त्यांनी दंडकारण्य चा शुभारंभ केला ग्रामीण भागामध्ये शाळेमध्ये कलापथकाच्या माध्यमातून जनजागृती करून प्रत्येक व्यक्तीने एक तरी झाड लावलेच पाहिजे, वाढवले पाहिजे, त्याचे संवर्धन जतन केले पाहिजे, ती जगवली पाहिजे. झाडे वाढली तरच आपल्याला शुद्ध हवा मिळेल.

----- Advertisements -----

           वृक्ष संवर्धनाने झाडावर पक्षी येतील. "वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे" संत तुकाराम महाराजांचे तर संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले की नगरेची वसावी जलाशय निर्माण महा वने लावा नानाविध या वैश्विक विचाराचा पगडा  स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात  अंगिकारला ते दूरदृष्टीचे होते. भविष्याचा वेध घेत त्यांनी दंडकारण्याची निर्मिती केली. लोकसहभागातून राज्याचे माजी महसूल कृषी मंत्री यांच्या हस्ते अमृत उद्योग समूहा मध्ये वृक्षाची लागवड करण्यात येवून पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हे कार्य या पुढे असेच चालू ठेवायचे असे ही बाबा खरात म्हणाले. कारण येणारा काळ आपल्याला क्षमा करणार‌ नाही. येणाऱ्या पिढीला सुखाचे दिवस पाहायचे असेल तर पर्यावरणा वाचून पर्याय नाही. झाडे लावा, झाडे जगवा. पाणी आडवा, पाणी जिरवा. पर्यावरण वाचवा, देश वाचवा. अशा घोषणा देत पर्यावरण दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी अमृत उद्योग समूहातील पदाधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

----- Advertisements -----

 

 

कार्य करा, पण त्यातून काहीतरी शिका.

स्वामी विवेकानंद
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin