भारत

प्रा. डॉ. प्रफुल्ल गवई यांचा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने होणार सन्मान

Blog Image
एकूण दृश्ये: 45

प्रा. डॉ. प्रफुल्ल गवई यांचा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने होणार सन्मान

     अमरावती { प्रतिनिधी }

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला असून प्रा. डॉ. प्रफुल्ल गवई यांचा या पुरस्काराने सन्मान होणार आहे.

        सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागचा पुरस्कार वितरण सोहळा हा मंगळवार, दि. १० जून ला सकाळी ०१:०० वाजता प्रमुख पाहुणे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच प्रमुख उपस्थित एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, मुंबई शहर, अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय शिरसाट मा मंत्री सामाजिक न्याय, विशेष उपस्थिती माधुरी मिसाळ मा. राज्यमंत्री सामाजिक न्याय, अरविंद सावंत लोकसभा सदस्य यांच्या उपस्थितीत प्रा. डॉ .प्रमुख प्रफुल्ल गवई त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

 

----- Advertisements -----

कोण आहेत प्रा डॉ प्रफुल्ल गवई ?    प्रा. डॉ. गवईंना लहानपणा पासूनच समाज सेवेचे धडे त्यांच्या घरातूनच मिळाले. त्याची फलश्रुती म्हणजे आजचा पुरस्कार होय. तशी पुरस्काराची रत्नमाला या माणसाच्या गळ्यात पडलेली आहे. पुरस्काराने त्यांचे कपाट गच्च भरून गेले आहे. वेळेचा सदुपयोग, सदैव सभोवती लोकांचा गराडा, ते कट्टर आंबेडकरवादी असून वैचारिक दृष्ट्या ते कधीच तडजोड करत नाही. याचा अर्थ असा नाही की, ते जातीवादी आहेत. उलट समता त्यांच्या रक्तात मुरलेली आहे. त्यांचे अनेक जाती धर्मातील लोक मित्र आहेत. दुःखात सापडलेल्या माणसाला मदत करणे एवढे त्यांना माहीत आहे. त्यांची कारकीर्द ही संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात ते व्यवस्थापन परिषदेचे सदस्य होते. तेव्हा त्यांनी विद्यार्थी उपयोगी अनेक उपक्रम राबवून आपला एक वेगळा ठसा अमरावती विद्यापीठात निर्माण केला. न्याय बाजू घेणे हे त्यांच्या रक्तात आहे. अनेक दुःखाचे डोंगर पार करून सदैव विनोदी राहणे हा त्यांचा मूळ पिंड..प्रा. होऊनही आई-वडिला समवेत राहणारा कुटुंबावर बारीक लक्ष ठेवून असतात आई-वडिलांची सेवा व्हावी म्हणून ते आजही वडिलोपार्जित घरात एकत्र राहतात. सामान्य माणसा सारखं जीवन जगणारे प्रा. डॉ. प्रफुल्ल गवईचा प्रवास सदैव असामान्य व्यक्तिमत्त्वाकडे जाताना दिसतो. गवईना विरोधकच नाही. अशा या समाज सेवेचा वेड असलेल्या व्यक्तिमत्त्वाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त होतो. म्हणजेच त्यांच्या कार्याला मिळालेला न्याय होय. हा पुरस्कार योग्य माणसाला प्राप्त झाला याचाही मनस्वी आनंद आहे. या बातमीने प्रा. डॉ. गवई यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

स्वतःला ओळखणे हीच खरी प्रगतीची सुरुवात आहे.

महात्मा गांधी