भारत

हुश्श ! झाला एकदाचा पूल सुरू; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना ;

Blog Image
एकूण दृश्ये: 412

हुश्श ! झाला एकदाचा पूल सुरू ; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना ; विद्यार्थी नागरिकांत आनंद ; अखेर चार वर्षांनंतर प्रतीक्षा संपली                          आमदार खताळ म्हणाले, आम्ही जनते सोबत !

      संगमनेर प्रतिनिधी

गेली चार वर्षांपासून हेलपाटे मारत असह्य झालेला रस्ता नाकेनऊ आणत होता. अखेर १५ जूनचा मुहूर्त सापडला आणि आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते माळुंगी नदीवरील पूलाची फीत कापून हवेत फुगे सोडत म्हाळुंगी नदीवरील पूल वाहतूकीसाठी खुला करण्यात आला. अखेर वाहतुकीचा हेलपाटाच आता बंद झाल्याने हुश्श ! झाला एकदाचा पूल सुरू अशी भावना विद्यार्थी नागरिकानी व्यक्त केल्याने परिसरात आनंदाचे डोही आनंद तरंग असेच वातावरण सर्वत्र दिसून आले.

शहरातील अत्यंत महत्त्वाचा असणारा स्वामी समर्थ नगर ते संतोषी माता मंदिर दरम्यानचा म्हाळुंगी नदीवरील पूल जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत जनतेसाठी खुला करण्यात आला. आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण करण्यात आले. शाळा सुरू होण्याच्या एक दिवस आधीच हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्याने विद्यार्थी आणि नागरिकांनी आमदार खताळ यांचे आभार मानले. 

चार वर्षांपूर्वी हा पूल कोसळला होता. त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती. या पुलाचे काम लवकर करावे यासाठी किरण पाटणकर, अमीत देव्हारे, संकेत पाटणकर,अनूप म्हाळस, अमोल डुकरे, भगवान घोडेकर, संजय गाडेकर, दगाबाई धात्रक, अल्पना तांबे, ओहरा कॉलेज , दिगंबर सराफ विद्यालयातील विद्यार्थी तसेच साईनगर, घोडेकर मळा, पंपिंग स्टेशन,भागातील  नागरिकांनी  साई भक्तांनी  आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभाग घेत स्थानिक नागरिकांनी रोष व्यक्त आंदोलने केली. अखेर म्हाळुंगी  पूल बनाव कृती समिती एक संगमनेरकर यांना यश आले. पर्यायी मार्ग म्हणून छोटा पूल उभारण्यात येवून स्वामी समर्थ मंदिर ते संतोषी माता मंदिरा दरम्यान मोठा मजबूत पूल लवकरच निर्माण करण्याचे आश्वासन पालिकेच्या वतीने देण्यात आले. या पुलाच्या कामास गती मिळाली.  खताळ म्हणाले की, पूर्वी या पुलाचे बांधकाम स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्या निधीतून झाले होते. काही वर्षांपूर्वी एका ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हा पूल कोसळला होता. त्यानंतर महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी तत्कालीन महसूल मंत्री आणि विद्यमान जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निधीसाठी पाठपुरावा केला आणि कामाला गती आली यामध्ये पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी राहुल वाघ यांचीही मोलाचे योगदान लाभले आहे.

----- Advertisements -----

 

म्हाळुंगी नदीचा पूल पडला असल्याने अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासातून एकप्रकारे मुक्तीच मिळाली आहे. आमदार खताळ यांनी या पुलाची पाहणी करून ठेकेदारांना दर्जेदार कामासाठी सूचना दिल्या होत्या. अल्पावधीत सदरचे बांधकाम पूर्ण करून नागरिकांसाठी पूल खुला करण्यात आला. 

      या लोकार्पण सोहळ्याला आ अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ ,नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे, महायुतीचे ज्ञानेश्वर कर्पे शिरीष मुळे , अविनाश थोरात ,कैलास लोणारी, माजी नगरसेवक कैलास वाकचौरे, रामभाऊ राहणे, संदीप देशमुख, सागर भोईर,माजी नगरसेविका अल्पना तांबे, उषा कपिले कांचन ढोरे कावेरी नवले दीपाली वाव्हळ रेखा गलांडे पूनम अनाप माजी नगरसेवक लखन जेधे, कैलास कासार, सुयोग गुंजाळ, तुषार ठाकूर ठेकेदार कैलास राऊत, यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते साईनगर घोडेकर मळा पंपिंग स्टेशन परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

----- Advertisements -----

आम्ही जनते सोबत-आमदार खताळ ;                      शहरातील साईनगर, पंपिंग स्टेशन, घोडेकर मळ्यासह शहरातील नागरी समस्या सोडवण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर आहोत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने याभागात विकासाची कामे गतीने होणार आहेत. नागरिकांनी आमच्यावर विश्वास ठेवावा, आम्ही आपल्या सोबत आहोत अशी भावना खताळ यांनी व्यक्त केली

समजूतदारपणा ही जीवनाची खरी शिकवण आहे.

संत तुकाराम
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin